पटना : वृत्तसंस्था – अनेकदा मुलींवर कपडे नीट घालण्यासाठी बंधनं घातली जातात. रेप होण्याची कारणेही त्यांचे कपडे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मुलींनी कपडे नीट घालावे असे मुलींना नेहमी सांगितले जाते. भारतात एक ठिकाण असं आहे जिथे खुद्द कुटुंबीय आपल्या घरातील मुलींना कपडे काढायला सांगतात. वाचून थोडं विचित्र वाटत आहे ना. असे करण्याला एक कारणही आहे.
मुली काढतात आपले कपडे
या ठिकाणी मुलींना कपडे काढून घराच्या बाहेर पाठवलं जातं. याचं कारणही तुम्हाला थोडं विचित्र वाटू शकतं. मुलींना कपडे काढून बाहेर पाठवण्याचं कारण म्हणजे देवता लज्जित होतील आणि पाऊस पडेल. जेणेकरून पीक चांगले येईल. बिहार राज्यातील हे ठिकण आहे. या ठिकाणी मुलींना रोज सुर्यास्तानंतर कपडे काढून नग्न होऊन आपापल्या घरातून बाहेर पडावं लागतं.
काय आहे कारण ? नेमक्या कुठे जातात मुली ?
जर पाऊस कमी पडला तर लोक अशीच धारणा ठेवतात आणि आपल्या मुलींना असे करण्यासाठी सांगतात. लोकांना असे वाटते की, मुलींना अशा प्रकारे नग्न करून शेतात पाठवल्यानंतर वरुण देवता लज्जित होईल. यामुळे पाऊस चांगला पडेल. तेथील लोकांचं असं म्हणणं आहे की, जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत ते असेच करतात.