अकोला (प्रतिनिधी) : अकोट उपविभागातील आडसुळ ते हिवरखेड,वणी वारुळा माळेगांव बाजार, अकोट हिवरखेड सौदळा या रोडच्या निविदा होऊन तब्बल ६ महिन्याचा कालावधी ओलांडला असून या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. यात काहींना आपला जीव गमावावा लागला आहे. यास सर्वस्वी अकोट बांधकाम उपविभागाचे सबंधीत अधिकारी जबाबदार असून येणाऱ्या आठ दिवसात जर नवीन कामाला सुरुवात झाली नाही.
तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले नाहीत. तर आकोट भारीप बहुजन महासंघ वचिंत बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे महिला आघाडीच्या प्रभाताई सिरसाट शोभा शेंळके भारिप उपजिल्हाध्यक्ष चंदु दुबे तालुकाध्यक्ष सदिंप आग्रे, सदिप इगंळे ,शैलेश धाडे, केशव बिलबिले ,नरेश बागर, हिफाजत खान, अक्षय तेलगोटे, शुभम डिगे, ज्ञानेश्वर वरईकर, सुनिता हिरोळे, रेखाताई बोरकर, मगंलाताई वानखडे शारदा नितोने, मिरा तायडे, विकास पवार ,सुदर्शन बोदळे,गौतम पचांग प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सरकटे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोट उपविभागीय सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अकोट यांच्या कार्यालयात अधिकारी हजर नसल्यामुळे येथे खाली खुर्चीला निवेदन सादर करण्यात आले.