नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या डाएटेरी गाईडलाईन्सनुसार, रोज आठ ग्लास किंवा दोन लीटर पाणी प्यायले पाहिजे. उन्हाळ्यात गरजेनुसार याचे प्रमाण वाढवू शकता. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे कोण-कोणते आजार होऊ शकतात आणि त्यापासून कसा बचाव करावा, ते जाणून घेवूयात…
उन्हाळ्यात थकवा जाणवणे :
उन्हाळ्यात नेहमी थकवा जाणवतो. या थकव्याचे कारण पाण्याची कमतरता हेच असते. शरीरातील पाणी कमी झाल्याने एनर्जी लेव्हल कमी होते. यासाठी भरपूर पाणी प्या.
हार्ट समस्या वाढू शकते :
कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात डिहायड्रेट वाढते. युरीन आणि घाम कमी येतो. रक्त घट्ट होते, यामुळे हृदयापर्यंत रक्ताचा संचार व्यवस्थित होत नाही. हृदयरोग असल्यास योग्यप्रमाणात पाणी प्या. काकडी, कलिंगड, टरबूज खा.
पचनशक्ती बिघडते, वजन वाढते :
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक मल-मूत्राद्वारे बाहेर पडतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. वजन नियंत्रणात राहील. पचनशक्ती चांगली राहील.
सांधेदुखी वाढू शकते :
कमी पाणी प्यायल्याने सांध्यांमध्ये वेदना होऊ शकतात. सांध्यातील गुळगुळीतपणा कमी होतो. यामुळे वेदना होऊ शकतात.
ड्रायनेस आणि मुरूम वाढू शकतात :
कमी पाण्याने चेहर्यावरील तजेला निघून जातो. त्वचेवर सुरकुत्या पडतात, मुरमे, डाग आणि कोरडेपणा येतो. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या, हिरव्या भाज्या आणि फळे खा.