नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रूमेटाईड अर्थरायटिस एक ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती निरोगी पेशींचेच नुकसान करण्यास सुरूवात करते. या आजाराने पीडित व्यक्तीला सांध्यात वेदना तसेच सूज आणि जळजळीची तक्रार असते. यामुळे शरीराचे तंत्र, त्वचा, डोळे, लंग्ज, हृदय अणि रक्ताच्या धमण्यांवर वाईट परिणाम होतो. या आजाराचा उपचार मोठ्या कालावधीपर्यंत किंवा आयुष्यभर सुरूच राहू शकतो.
अशी असू शकतात लक्षणे
– बोटावर गाठ किंवा सूज
– सांधे आखडणे, कमजोरी, सूज
– खुप जास्त थकवा जाणवणे
– सांधे, पाठ आणि मांसपेशींमध्ये वेदना
– चालणे-फिरण्यात अडचण येणे
– तोंड सूकणे
असा असावा डाएट प्लॅन
धान्य- जुने तांदूळ, गहू, जव
डाळी- हरभरा, मूग, मसूर डाल
फळे आणि भाज्या – सफरचंद, पपई, शेवग्याच्या शेंगा, टिंडा, पडवळ, भोपळा, दुधी भोपळा, दोडका, काकडी, कारले
इतर – ओवा, आले, बडीसोफ, हिंग, काळे मीठ, तेल, कोमट पाणी, काळीमिरी, सैंधव मीठ, लसूण, जीरे, तूप, एरंडी तेल, मलई नसलेले दूध, ताक.
कुणाला जास्त धोका
– महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त धोका असतो.
– 30 वयानंतर आजार होण्याची शक्यता वाढते.