भोपाळ वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपला धक्का दिला आहे.भाजपचे दोन आमदार कॉंग्रेसच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे कर्नाटकातील राजकिय नाट्यानंतर सावध झालेल्या कॉंग्रेसने भाजपला धक्का दिल्याची चर्चा राजकिय वर्तुळात आहे. तर हे दोन्ही आमदार कॉंग्रेस सोडून भाजपात गेले होते. त्यानंतर ते दोघेही भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये येणार असल्याची शक्यता कमलनाथ सरकारमधील मंत्री जयवर्धन सिंह यांनी वर्तवली आहे.
Bhopal: The two BJP MLAs, Narayan Tripathi & Sharad Kaul, who voted in favour of Kamal Nath Govt during voting on criminal law(amendment) in Madhya Pradesh assembly today, have been sent to an undisclosed location by Congress. They will attend a dinner with CM Kamal Nath tonight. pic.twitter.com/1J30yv0zJF
— ANI (@ANI) July 24, 2019
मुख्यमंत्री कलमनाथ यांनी क्रिमीनल लॉ दुरुस्ती विधेयक विधानसभेत मांडले होते. त्यावर झालेल्या मतदानात भाजपचे आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी काँग्रेसच्या बाजूनेच मतदान केले. तर याआधी विरोधकांना कमलनाथ यांनी आव्हान दिले होते की, तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही बहुमत चाचणी घेऊ शकता. यावर विरोधी पक्ष नेते गोपाल भार्गव म्हणाले होते, की वरिष्ठ पातळीवरून नंबर १ आणि नंबर २ कडून आदेश आल्यास मध्य प्रदेशातील सरकार एक दिवसही टिकणार नाही.
कर्नाटकातील राजकिय नाट्यानंतर कॉंग्रेसचे सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपचे पुढील लक्ष्य आता मध्यप्रदेश असल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे. त्यानंतर कॉंग्रेसच्या बाजूने मतदान करत कमलनाथ सरकारला पाठींबा हा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी दिल्याचे भाजपचे आमदार त्रिपाठी आणि कौल यांनी सांगितले. तर विधानसभेत सत्ताधारी पक्ष कॉंग्रसचे १२१ आमदार आहेत. अध्यक्ष या नात्याने आज झालेल्या मतदानात एनजी प्रजापती यांनी या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला नाही. या दोन आमदारांचे मिळून एकूण १२२ मते कॉंग्रेसच्या बाजूने मिळाली. दोन्ही आमदार सध्या अज्ञातस्थळी असून ते लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.