बहुजननामा ऑनलाईन – घर असो किंवा ऑफिस असो तुम्ही जर सतत बिजी असाल आणि स्वत:ला वेळ देत नसाल तर जेव्हा तुम्ही फ्री होता आणि फक्त बसलेले असता तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटू लागतं. याचं काय कारण आहे हे आपण जाणून घेऊयात.
साधारणपणे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सतत बिजी राहणं धोकादायक असतं. सतत कामात बिजी राहण्याची सवय असेल तर नकळत काही मानसिक आजार जडण्याची शक्यता असते.
जॉन कबाट-जिन्न यांनीही त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे की, तुम्ही सतत किंवा जास्त बिजी असाल तर याला काही मर्यादा असणं गरजेचं आहे. जॉन यांनी असंही नमूद केलंय की, त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य सतत व्यस्त असण्याचा आजार रोखण्यासाठी घालवलं. ते सांगतात की, आपण आपल्या कामातून थोडा वेळ काढून गाणी ऐकणं, चांगल्या कथ वाचणं, सवत:शीच गप्पा मारणं अशा काही अॅक्टीविटीज करायला हव्यात.
वाढतं तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांच्यातील संबंधांचा ताळमेळ ठेवून आपण जगायला शिकायला हवं. व्यायाम करायला हवा. कायमच ताण, तणाव, सतत चिंता करणं, घाईत असणं या गोष्टी शरीरासाठी घातक ठरू शकतात.