जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचे उपनेते व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमासाठी आलेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर गुलाबराव पाटील प्रत्त्युत्तर देताना अमित शहांना दीड वर्षे उशिरा का होईना आता शुद्ध आली, याचा आनंदच असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा होता. तेव्हा ते सिद्धूदुर्ग येथे कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेने युती धर्म पाळला नसल्याचा आणि जनदेशाचा अनादर करत सत्तेसाठी शिवसेना विरोधी पक्षांसोबत गेल्याची टीका शहांनी केली होती. त्यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहांना दीड वर्षे उशिरा का होईना आता शुद्ध आली, याचा आनंदच असल्याची जोरदार टीका पाटील यांनी केली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटवरून त्यांनी सेलेब्रिटींवरही निशाणा साधला आहे. ‘शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने आंदोलन केले पाहिजे, यावर सेलिब्रिटींना आता जाग आली आहे. शेतकरी ६० दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानापासून ते दिल्लीपर्यंत आंदोलन करत आहेत. शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतजमिनी हिसकावण्याचा प्रयत्न व्हायला नको, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. पण केंद्र सरकार त्यांच्याशी बोलणी करायला तयार नाही. उलटपक्षी तुम्ही आमच्याकडे या, मग चर्चा करू, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. परंतु शेतकऱ्याला पाठीचा कणा आहे. सरकारनं त्याच्या दरात चर्चेसाठी जायला हवे, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.