नवी दिल्ली : वृत्तसंस्था- तोट्यात सुरु असलेल्या सरकारी टेलिकॉम कंपन्या भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) च्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार, MTNLच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून अर्धी होणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बनलेल्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्स (GOM)मध्ये सहमती झाली असून GOMने या प्लॅनला हिरवा सिग्नल दाखवला आहे.
रिटायरमेंटचं वय होणार 58 वर्षे
रिवाईवल प्लॅननुसार, सरकार MTNL आणि BSNL च्या कर्माचाऱ्यांच्या रिटायरमेंटचे वय कमी करून 58 वर्ष होणार आहे. स्पेशल केस नुसार, कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटचं वय कमी होणार.
50 वर्षांच्या पुढे कर्मचाऱ्यांसाठी VRS स्कीम
सरकार MTNL आणि BSNLच्या 50 वर्षांपेक्षा पुढील 85 हजार कर्मचाऱ्यांना VRS स्कीम देणार आहे. या दोन्ही कंपनीत 85 हजार कर्मचारी राहतील. आता दोन्ही मिळून 1.80 लाख कर्मचारी आहेत. VRS वर सरकार 40 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकार पुढील 8 वर्षात कर्मचाऱ्यांना रक्कम अदा करणार आहे.
दोन्ही कंपन्यांवर 40 हजार कोटीचं कर्ज
दोन्ही कंपनीच्या रिवाईवलसाठी बँकांसोबत लोन रिस्ट्रक्चर करण्यावर सहमती झाली आहे. MTNL च्या कर्जाचा कालावधी 4-5 वर्ष वाढणार आहे. दोन्ही कंपन्यांवर जवळपास 40 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. दोन्ही कंपनीच्या मर्जिंगवरही सहमती झाली आहे. या स्कीमवर सरकार 1-2 आठवड्यात कॅबिनेटची मंजुरी घेणार आहे.