मुंबई : बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात गावा-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा (Gram Panchayat elections) कार्यक्रम जाहीर (declared) झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका((Gram Panchayat elections)) जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे.
23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम ?
– 15 डिसेंबर तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील
– 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
– 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जाची छाननी
– 4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी
– 15 जानेवारी रोजी मतदान
– 18 जानेवारी रोजी मतमोजणी
31 डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल. 4 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात 7.30 ते दुपारी 3 पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.