बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत, याच पार्शवभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं देखील स्पष्ट केलं आहे. ‘महाराष्ट्रात सरकार स्थापनेवर फिरणारे ढग काही काळातच हटणार असून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस अशा विविध पक्षांत अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सरकार कार्यभार स्वीकारेल, असं संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
त्याचवेळी, आमदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणासंदर्भात राऊत यांना विचारण्यात आल्यावर राऊत म्हणाले की, षडयंत्र हेच लोक करतात, ज्यांना शिवसेनेला सरकार स्थापन करताना बघायचे नाहीये. परंतु सेनेमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान आहे. तर राष्ट्रवादीत लोकशाही पद्धतीने एखादा निर्णय घेण्यावर पक्षप्रमुख विचार करून थोडा जास्त कालावधी घेतात. कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याची कॉंग्रेसची शतकानुशतके जुन्या परंपरा आहेत. मात्र सरकार स्थापनेबाबत उद्यापासून चित्र स्पष्ट होऊ लागेल, ”असं देखील राऊत यांनी सांगितले.
तसेच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसंदर्भात विचारले असता राऊत म्हणाले की, ‘ उद्धव ठाकरे हे नेहमी शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतात, राज्यातील परतीच्या पावसामुळे शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी ते पंतप्रधानांना भेटणार आहे. ‘अशी राऊत यांनी स्पष्ट केले.
Visit : bahujannama.com