बारामती : बहुजननामा ऑनलाईन – शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजारांची मदत हा जुमला आहे. देशात घडणाऱ्या विविध घटना पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी छुप्या पद्धतीने हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्तेसाठी हे सरकार देशात दंगली घडवतील, अशी घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
माळेगाव येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या प्रयत्नातून विविध लाभांच्या वस्तूंचे वाटप व भूमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या कामाचे देखील पवार यांनी कौतुक केले. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या अस्मितेवरील हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी विरोधी धोरण चुकिचे आहे. तेलंगणात राबविलेली शेतकरी सन्मान योजना शेतकरी हिताची आहे. तेथे शेतकऱ्यांना २० हजार वार्षिक मदत केली जाते. मात्र केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना म्हणजे जुमलेबाजी आहे. अशी टीका पवारांनी केली.
गॅस दरवाढीने सर्वसामान्य यांचे कंबरडे मोडले आहे. तसेच घटना जाळणे किंवा बदल करणे हा छुपा अजेंडा आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीला उपोषण करावे लागणे हे देशाच्या इतिहासात प्रथम घडले आहे, अशी टिका पवार यांनी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती टेक्साटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, सभापती संजय भोसले, बांधकाम आरोग्य सभापती प्रविण माने. संभाजी होळकर. राणी शेळके. सुजाता पवार, तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सचिन तावर यांनी मानले .