नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्य संस्कारही तिथेच केले पाहिजेत. कोरोना व्हायरसने देशात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्य संस्काराबाबत अडचणी आल्या, तेव्हा सरकारने अंत्य संस्कार आणि पोस्टमोर्टमवर गाईडलाइन जारी केली आहे. मृतांच्या कुटुंबाच्या भावनांचा सन्मान करत त्यांच्या कौन्सिलिंगद्वारे सांगितले जात आहे की, सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल किती महत्वाचे आहे ? सहा पानी आदेशानुसार शवदहन केले जाणार नाही. यामुळे शव जास्त लांब नेले जाऊ शकत नाही.
व्हायरसमुळे जर रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्य संस्कार जवळच करावे लागतील. याशिवाय काही विशेष प्रकरणे सोडून इतर पोस्टमोर्टमची अनिवार्यता होणार नाही. जर कोणत्याही स्थितीत पोस्टमोर्टम करावे लागले तर शवगृह पूर्णपणे साफ केले जाईल. फॉरेन्सिक डॉक्टर पीपीईसह सर्व सुरक्षेच्या उपायांचे पोस्टमार्टम करतील. आतापर्यंत देशात कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रातील तीन रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शवाचे अंत्य संस्काराबाबत सूचना सगळ्या राज्यात पाठवल्या गेल्या आहेत. शवाच्या अंत्य संस्काराने संक्रमण होत नाही, पण यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वॉर्डसह शवगृह आणि अंत्य संस्कारस्थळी असलेल्या लोकांनाही प्रतिक्षीत करणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, संक्रमित रुग्णांच्या शवाची भीती नाही पण पोस्टमोर्टम दरम्यान त्याच्या फुफ्फुसातून संक्रमण होऊ शकते. यासाठी हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना, शवगृह, अंत्य संस्कार स्थळावर आणि कुटुंबियांसाठी हे निर्देश सहभागी केले आहेत. यात कुटुंबियांच्या कौन्सिलचाही उल्लेख केला आहे.