लखनऊ : वृत्तसंस्था – विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजित बच्चन यांची रविवारी सकाळी गोळी मारून हत्या झाली असून पोलीस त्या हत्याकांडाचा तपास करत आहेत. रंजित यांचे तीन विवाह झाले असल्याची माहिती मिळत असून पहिला विवाह कुटुंबाच्या सल्ल्याने केला होता. त्यानंतर ते पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यावर २००२ पासून २००९ दरम्यान सायकल प्रवासादरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या कालिंदी शर्मा सोबत दुसरा विवाह केला. नंतर पुन्हा काही वर्षांनी त्यांनी लखनऊच्या एका अधिकाऱ्याच्या मुलगी निर्मला श्रीवास्तव सोबत तिसरा विवाह केला. कालिंदी शर्मा आणि श्रीवास्तव या दोघींमध्ये सुरुवातीला वाद झाला होता. पण त्यांच्यात सहमती झाल्यावर त्या एकत्र राहायला लागल्या.
तर कालिंदी शर्माच्या बहिणीने २०१७ मध्ये रंजित यांच्यावर छेडछाड आणि बलात्काराचा गुन्हा गोरखपूरच्या शाहपूर पोलीस ठाण्यात दाखल केला होता. रंजित त्यांच्या आई-वडिलांद्वारे तिची मारहाण करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर पोलिसांची एक ती या गुन्ह्याचा तपास करत होती.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोन संशयितांचे स्केच समोर आले असून या व्यक्तींची माहिती देणाऱ्यांना ५० हजार रुपये बक्षीसाची घोषणा केली आहे. पोलीस आयुक्त सुजित पांडे यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, दोन संशयितांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहण्यात आले असून एका संशयिताने आपला चेहरा झाकलेला होता. संशयिताची माहिती देणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.