लखनऊ : वृत्तसंस्था – ‘रीळ लाईफ’ आणि ‘रिअल लाईफ’ यात खूप फरक असतो. आपण चित्रपटात, मालिकेत अनेक कथा बघतो, कट -कारस्थान बघतो , परंतु आपल्या दैनंदिन जीवनात त्याच अनुकरण सहसा कोणी करत नाही. परंतु उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये अशीच एक एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे वडिलांना कंटाळलेल्या एका मुलीने स्वत: च्या बनावट मृत्यूचा कट रचला आणि तिच्या प्रियकराबरोबर पळ काढला. गोरखपूरच्या चौरीचोरा पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे.
काजल असे या मुलीचे नाव आहे. काजलने कबूल केले की तिने एक मोठी चूक केली आहे. वडिलांच्या त्रासाला कंटाळून तिने हा कट रचला. मुलीचा प्रियकर एक शिक्षक असून हरिमोहन शर्मा असे त्याचे नाव आहे. एका सिंगिंग ऍपद्वारे दोघे संपर्कात आले होते. १५ दिवसांपूर्वी त्यांनी हा फिल्मी प्लॅन बनवला होता. शिक्षक मुलाने सांगितले की, संपूर्ण प्लॅन काजलने रचला होता. मुलीने तिचे रक्ताळलेले डोळे, हात आणि तोंडाला बांधलेली पट्टी अशी छायाचित्रे वडिलांना व्हॉट्सअॅपवर पाठविली. मुलीचे स्वतः अपहरण झाल्याचे सांगून तिने तिच्या वडिलांचा वॉट्सअॅपवर हत्या करुन बदलाचा संदेश पाठविला आणि त्यानंतर ती प्रियकरासह फरार झाली.
चौरीचौरा पोलिस स्टेशन चे सीईओ सुमित शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी बालबुजुर्ग ओमनगर येथे राहणारे शिक्षक अनिल कुमार पांडे यांची २३ वर्षीय मुलगी काजल पांडे ही ऑफिस ला जातेय असे सांगत सकाळी ९ वाजता घराबाहेर पडली होती. वडिलांनी विचारले की, आज मोहरम ची सुट्टी असेल तर आपले कार्यालय खुले असल्याचे तिने सांगितले. यानंतर सकाळी १०.४५ वाजता वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर अपहरण आणि खुनाचे फोटो आणि मेसेज आले. संदेश आणि फोटो पाहून अनिल पांडे यांना धक्काच बसला.