मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने (Monsoon) संपूर्ण केरळ व्यापला आहे. गुरुवारी सकाळपासून केरळमध्ये (Kerala) जोरदार पावसाला सुरुवात झाली. केरळमध्ये मान्सून दाखल (Monsoon arrives) झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली. कर्नाटकच्या (Karnataka) किनारपट्टीचा बहुतांश भागात मान्सून दाखल (Monsoon arrives) झाला. त्यानंतर मान्सून आज (शनिवार) महाराष्ट्रात दाखल झाला असून मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला परिस्थिती अनुकुल आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान weather तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1401094446272290819
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
पुढील 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भाग व्यापेल. याशिवाय पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये रायगड, ठाणे, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कृपया हे देखील वाचा:
मोदी सरकार LIC बाबत घेणार मोठा निर्णय ! मेगा IPO संदर्भातील हालचालींना वेग
‘राज-उद्धव’ एकत्र येणार ?, खा. संजय राऊतांचे सूचक वक्तव्य
पुण्यात आघाडी अथवा युती झाली तरी शिवसेना 80 जागांवर लढणार – संजय राऊत
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय ! खासगी रूग्णालयांना आणखी एक दणका