बहुजननामा ऑनलाइन टीम – 2021चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना लॉटरी लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे. कामगार कार्यालयाने जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीतील ACIPI चा डेटा जारी केला आहे. यानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचे निश्चित केली आहे. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने जून 2021 पर्यंत महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याला स्थगिती दिली होती.
AG ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष आणि सिटीझन ब्रदरहुडचे अध्यक्ष हरीशंकर तिवारी म्हणाले की, महागाई दर 4 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. केंद्र सरकार वेळोवेळी त्यात सुधारणा करत असते. त्याची गणना टक्केवारीच्या मूलभूत वेतनवर आधारित आहे. आताच्या घडीला कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना स्वतंत्र महागाई भत्ता मिळत आहे. काही जाणकारांच्या मते हा महागाई भत्ता पूर्णपणे करपात्र आहे. म्हणजेच, महागाई भत्त्याच्या नावाखाली मिळणारी रक्कम ही करपात्र धरली जाणार आहे.
कर्मचा-यांना दिल्या जाणा-या महागाई भत्त्याचा संबंध थेट अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाशी असतो. त्याच्या सूत्रामध्ये एआयसीपीआयची सरासरी मोजली जाते. जून 2021 पर्यंत महागाई भत्ता 30 ते 32 टक्क्यापर्यंत वाढले. कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे 15 टक्क्यांची वाढ होईल. केंद्र सरकारकडून दर 6 महिन्यांनी त्यात सुधारणा केली जात असल्याचे तिवारी म्हणाले. 01 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंतची कोणतीही थकबाकी मिळणार नाही, असे केंद्र सरकारच्या आदेशात स्पष्ट केले आहे. जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता आणि डीआरसंदर्भात निर्णय होईल. याची अंमलबजावणी एक-एक करून केली जाणार आहे, असेही सरकारी आदेशात म्हटले आहे.