मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकतीच नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. हे वर्ष सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी गोड जाणार आहे असं दिसत आहे. कारण नवीन वर्षाच्या अगदी पहिल्याच आठवड्यात राज्य सरकारनं सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गोड बातमी दिली आहे. 1 जुलै 2019 पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 5 टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं याबाबतचा निर्णय घेतला आहे.
7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्याचा दर हा 12 टक्क्यांवरून आता 17 टक्के असा करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील महागाई भत्त्याची वाढ ही दि. 1 डिसेंबर 2019 पासून रोखीनं देण्यात येणार आहे. 1 जुलै ते 30 नोव्हेंबर 2019 या 5 महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्याची थकबाकी ही नंतर स्वतंत्रपणे निर्णय घेऊन देण्यात येणार आहे.
नववर्षाच्या सुरवातीलाच सरकारनं कर्मचारी आणि अधिकार्यांना गोड बातमी दिली आहे. महागाई भत्त्याची रक्कम देण्यासाठी तरतुदी आणि कार्यपध्दती ज्या प्रमाणे सध्या आहेत त्याचप्रमाणे आगामी काळातही लागू करण्यात येणार आहे.