नवी दिल्ली, वृत्तसंस्था – मोदी सरकारने शेतक-यासाठी एक मोठी योजना आणली आहे. केवळ 15 दिवसात आता शेतक-यांना मिळणार 3 लाखाचे कर्ज शेतक-यांचे उत्पन्न दुपट्ट होण्यासाठी मोदी सरकार सतत शेतक-यासाठी काही ना काही उपाययोजना करत असते. शेतकरी शेती करण्यासाठी सावकाराकडून कर्ज घेत असतात. परिणामी त्यांना त्याचा परतावा वेळेत करता येत नसल्याने ते त्याच कर्जात अडकून राहतात. सावकारीपाशआतून शेतक-यांला मुक्त करण्यासाठी मोदी सरकारणे हा उपाय काढला आहे.
सावकाराकडून महाग कर्ज घेण्यापेक्षा जर सरकारकडूनच शेतक-यांना स्वस्त कर्ज मिळाले तर त्याचा त्याला निश्चितच फायदा होईल. शेतक-याने कर्जासाठी अर्ज केल्या नंतर केवळ 15 दिवसाच्या आतच केसीसी देणे व कर्ज देणे बॅंकांना बंधन कारक राहणार आहे. त्यासाठी तशा बॅंकांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.
देशात सध्या फक्त 7 कोटी शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. तर एकूण शेतकरी परिवार 14.5 कोटी आहेत. सरकारच्या धोरणानुसार बॅंकांनी सरकारकडू कर्ज घेऊन शेती करावी. कर्ज प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क सरकारणे संपवले आहे. केंद्रिय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, सरकार प्रत्येक पात्र शेतक-याला केसीसी देऊ इच्छित आहे. यासाठी केंद्र सरकार राज्यांना सोबत घेऊन काम करु इच्छित आहे.