जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – जागतिक स्तरावर दलाल सक्रिय झाले असून सोन्याच्या भावात चढ-उतार होत आहे. गुरुवारी चांदीचा भावाही घसरून दीड हजार रुपये प्रति किलो होता. तर सोन्याचा भाव ३०० रु. प्रति तोळ्याने वाढला आहे.
मागच्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया घसरला असून सोने-चांदीचे भाव वाढत आहेत. दुसरीकडे मुंबई शेअर बाजार, देशविदेशातील शेअर बाजार सतत घसरत असून सोने-चांदीचे भाव वाढू लागले आहेत. तसेच जागतिक स्तरावर दलाल सक्रिय झाल्याने त्यांनी अचानकच खरेदी वाढवली असून दोन्ही धातूंची किंमत एकदमच वाढली आहे. चांदीची खरेदी कमी झाल्याने चांदीमध्ये प्रति किलो दीड हजार रुपयाची घसरण झाली आहे.
मागच्या काही दिवसांत चांदीत वाढ झाली असून १३ फेब्रुवारीला ४६ रु. प्रति किलो असलेली चांदी १५ तारखेला ४७ हजार रुपयांवर आली. तर १८ तारखेला ४७,५०० रु., २० तारखेला ४८ हजार रु. आणि २१ तारखेला ४९ हजार रु. प्रति किलो होती. २६ फेब्रुवारीपर्यंत ४९ हजार रु. होती. पण २७ तारखेला दीड हजार रु. नी चांदी घसरत ४७,५०० रुपयांवर आली.
अजूनही दरवाढ होऊ शकते-
जागतिक स्तरावर सोने-चांदीची खरेदी-विक्री खाली-वर होत असल्याने त्यांच्या दरात चढ-उतार होत आहेत. तसेच हे दर आणखी वाढतील अशी शक्यता असल्याचे जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी यांनी सांगितले.
दलालांची हातचलाखी
दलाल अमेरिका, युरोपीय देशात सक्रिय झाले असून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. यातच आता चांदीचे भाव कमी झाले असून ते अजून वाढू शकतात. चांदी ५५ हजार रु. प्रति किलो आणि सोने ४५ हजार रु. प्रति किलो होऊ शकते. ही परिस्थिती दलालांमुळे निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.