मुंबई बहुजननामा ऑनलाईन – देशात असहिष्णूता आणि द्वेषामुळे होणारे गुन्हे आणि मॉरल पोलीसिंग वाढल्याने देशाच्या आर्थिक विकासाचे नुकसान होऊ शकते. असं गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदि गोदरेज एका महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना म्हणाले. सेंट जेवियर्स महाविद्यालयाला १५० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आदि गोदरेज म्हणाले, एकीकडे केंद्र सरकार भारताला पाच ट्रीलीयन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष ठेवते. तर दुसरीकडे देशात जातीय हिंसा, असहिष्णूता या गोष्टींमुळे नुकसान होत आहे.
भारत सध्या मोठ्या गरीबीच्या संकटातून जात आहे. ही परिस्थिती आर्थिक विकासाच्या गतीला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे आपल्याला आपल्या क्षणता ओळखण्याची गरज आहे. या गोष्टी आपल्याला क्षमता ओळखण्यापासून रोखू शकतात.
त्यासोबतच देशात बेरोजगारी वाढली आहे. चार दशकांतील सर्वाधिक बेरोजगारी सध्या वाढली आहे. त्यात देशातील महानगरांमध्ये पाण्याचे संकटही वाढलेले आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नाहीत. त्यामुळे या सर्वांशी लढण्यासाठी आपल्याला खुप तयारी करावी लागणार आहे. त्यानंतरच आपण आर्थिक प्रश्नांना नीट तोंड देऊ शकू असे ते म्हणाले.