तिरुअनंतरपुरम वृत्तसंस्था – धर्माच्या नावावर हिंसा पसरविणाऱ्यांवर टीका राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अदूर गोपलकृष्णन यांनी केली होती. त्यावर केरळच्या एका भाजप नेत्याने टीका केली आहे. अदूर यांना जर जय श्रीराम च्या घोषणा सहन होत नसतील तर ते चंद्रावर किंवा इतर ग्रहावर जाण्यासाठी स्वतंत्र आहेत. अशी फेसबुक पोस्ट करत केरळ भाजपचे प्रवक्ते बी. गोपालकृष्णन यांनी टीका केली आहे.
अदूर यांनी बी. गोपाळकृष्णन यांच्या टीकेवरून वाद झाल्यानंतर आपली बाजू मांडली आहे. मी पत्राच्या माध्यमातून जो आवाज उठवला आहे. तो सरकारविरोधात किंवा जय श्रीराम विरोधात नाही. हा आवाज मारहाण करून एखाद्याची हत्या केली जाते. त्या घटनांदरम्यान या जयघोषांचा वापर युद्धाच्या घोषणांसारखा केला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवला आहे. असं अदूर म्हणाले.
गोपाळकृष्णन यांची फेसबुक पोस्ट
अदूर एक प्रतिष्ठित निर्माते आहेत. मात्र ते देशाच्या संस्कृतिचा अपमान करण्याचा हक्क त्यांना नाही. जर हे ऐकण्याची त्यांची इच्छा नसेल तर त्यांनी स्वत: चे नाव श्रीहरिकोटा येथे नोंदवावे आणि चंद्रावर जावे.