नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत हा एक संस्कृतीप्रधान देश असून भारतात महिलांच्या वेषभूषेबद्दल अगोदरपासूनच काही वाद आहेत. अलीकडील काळात मुली पाश्चिमात्य संस्कृतीनुसार वेशभूषा करताना दिसून येतात. फारच कमी मुली भारतीय संस्कृतीप्रमाणे पेहराव करताना दिसून येतात. पण देशात अशीही जागा आहे जिथे मुलींना जीन्स घालण्यास बंदी आहे.
हरियाणा येथे महिला व बाल विभागात काम करणाऱ्या महिलांना सभ्य कपडे घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर श्रीनगरमध्ये स्थानिक महिलांनाच नाही तर पर्यटनासाठी येणाऱ्या महिलांनाही योग्य कपडे परिधान करावे लागतात. काश्मीरमधील जमात – ए – इस्लामी काश्मीर या संघटनेने जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी येणाऱ्या महिलांना अशी वस्त्रे घालणे म्हणजे स्थानिक संवेदनाबाबत असंवेदनशील असणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
तर हरियाणामधील एका महाविद्यालयातील शिक्षकांनी मुलींचे आदर्श महाविद्यालय असून लहान ड्रेस घातल्याने विद्यार्थिनी पूर्णपणे झाकल्या जात नाहीत, त्यामुळे त्यांना छेडखाणीला समोर जावे लागते, असे म्हटले आहे. तसेच कॉलेजमध्ये पाश्चिमात्य कपड्यांवर बंदी आणत जो नियम मोडेल त्याला १०० रु. चा दंड भरावा लागतो.
चेन्नईमधील साईराम इंजिनियरिंग कॉलेजमध्ये काही मुलींना काय घालावे न अन काय घालू नये याबद्दल नियम केले गेले आहेत. थिरुवल्लुवर येथे आरडीएम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये गेस्ट लेक्चर घेणाऱ्या लेक्चररलाही कपड्यांबद्दलचे नियम पाळावे लागतात.
तामिळनाडूमधील एका मंदिरात मद्रास उच्च न्यायालयाने मंदिरात जीन्स, तसेच छोटे कपडे घालण्यास मनाई केली आहे तसेच तेथील अरुल्मिगु रामनाथ स्वामी मंदिरात अनेक पर्यटक भेट देत असून कोणताही पर्यटक धोती, पायजमा किंवा फॉर्मल शर्ट-पॅन्टमध्ये आणि स्त्रिया साडीमध्ये नसतील तर त्यांना मंदिरात प्रवाहस दिला जाणार नाही.
राजस्थानमधील बारमेर मध्ये मुलींनी जीन्स घालणे, मुलींनी मोबाईल फोनही वापरण्यावर बंदी आहे. तर उत्तर प्रदेश येथील मुजफ्फरनग्रास आणि हारनपुस जिल्ह्यातील पश्चिम बंगालमधील १० गावात कपडे घालायला बंदी आहे.