नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्रकार विक्रम जोशी यांचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केला. मुलींसोबत जात असताना काही अज्ञातांनी त्यांना घेरले होते. मुलींच्या डोळ्यादेखतच त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये पत्रकार विक्रम जोशी गंभीर जखमी झाले होते. गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी 9 सध्या जणांना अटक केली आहे.
पत्रकाराच्या भाजीसोबत झालेल्या छेडछाड प्रकरणी तक्रार केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. विक्रम यांच्या भाचीने 16 जुलै रोजी काही तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात छेड काढत असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसात तक्रार दाखल केल्याच्या रागातून या अज्ञात तरुणांनी बदल्याच्या भावनेतून पत्रकार विक्रम यांना मारहाण करून गोळीबार केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुण मिळून पत्रकार विक्रम जोशी यांना बेदम मारहाण करत आहेत. सोमवारी विक्रम आणि त्यांच्या दोन मुली दुचाकीवरुन जात होत्या. त्यावेळी काही अज्ञात तरुणांनी त्यांना घेरुन वाद घालण्यास सुरुवात केली. या तरुणांनी बेदम मारहाण करत त्यांना गोळी घातली.भाचीसोबत झालेल्या प्रकरणानंतरही पोलिसांनी केवळ एफआयआऱ दाखल केला होती. मात्र कारवाई न केल्यामुळे हा प्रसंग घडल्याचा आरोप पत्रकार विक्रम जोशी यांच्या नातेवाईकांनी केला आहे.