अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – दहेंद्री येथे गवळी समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला. यात अनाथाची माय सिंधूताई सपकाळ यांची विशेष उपस्थिती होती. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर गवळी समाजाच्या पारंपरिक वेषात उपस्थित होते. गरिबी वाईट असते, परंतु गरीब कधीही वाईट नसतो. गवळी समाजाने सुशिक्षित होऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकावे. समाजातील बहुतांश नागरिक अजूनही दारिद्र्यात असून त्यांना बाहेर काढण्यासाठी समाजातील वरिष्ठांनी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व अनाथांची मायी सिंधुताई सपकाळ यांनी केले. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर अचलपूर, धारणी, बैतूल, भैसदेही, चिखलदरा, अमरावती, मुंबई, उस्मानाबाद, धुळे,नंदूरबार या परिसरातील मोठ्या प्रमाणावर गवळी समाजबाधवांची होते. या मेळाव्यात समाजाच्या अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या मेळाव्याच्या नियोजनासाठी राजनकुंड, चुरणी, दहेंद्री, अचलपूर, चिखलदरा, धारणी परिसरातील युवकांनी मागील एक महिन्यांपासून परिश्रम केले.
संचालन राजू येवले यांनी केली.मेळाव्यात सुमीत चावरे, सागर येवले, आलोक अलोकार, गोकूल अलोकार, रूपेश भक्ते, संजय काळे, नागेश मुंडे, गजेंद्र येवले, दिनू येवले, हरी येवले, किशोरी येवले, देवेंद्र येवले, गोकूल येवले, अंबर येवले, संदीप येवले, अनिल येवले, मंगेश येवले, आशिष अलोकार, गजेंद्र येवले, अभिजित येवले यांनी परिश्रम केले.