नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असून अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी ‘नमस्ते’ म्हणत केली. शेवटी त्यांनी भारताबद्दल खूप प्रेम व्यक्त केले. याशिवाय त्यांनी भारताच्या एकता आणि विविधतेबद्दलही बोलले. ट्रम्प यांनी आतंकवाद आणि इसिसचा लीडर बगदादी आणि आतंकवादाचाही उल्लेख केला.
आतंकवादाबद्दल काय बोलले ट्रम्प-
1. अमेरिका भारताला प्यारी असून भारताचा आदर करते. अमेरिका नेहमी भारताचा इमानदार आणि निष्ठावान मित्र राहणार आहे. ५ महिने अगोदर अमेरिकेने टेक्सासमध्ये विशाल फुटबॉल स्टेडियममध्ये तुमच्या महान पंतप्रधानांचे स्वागत केले होते आणि आज भारताने अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आमचे स्वागत केले आहे.
2. लाखो हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, इसाई आणि यहुदी एक एकसाथ प्राथर्ना करतात या गोष्टीसाठी भारताचे पूर्ण जगात कौतुक केले जाते. भारताची एकता संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे.
3. पंतप्रधान मोदी यांनी चहावाल्याच्या रूपात सुरुवात केली होती. त्यांनी चहा विकण्याचे काम केले. प्रत्येकजण त्यांच्यावर प्रेम करतो. पण मी तुम्हाला सांगतो की, ते खूप कठोर आहेत. मोदीला प्रत्येकजण प्रेम करतो. ते फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगातच एक उत्कृष्ट नेते आहेत. त्यांनी चहावाल्यापासून एका यशस्वी नेत्यांपर्यंत प्रवास केला आहे.
4. आम्ही इसिसचे नेते दरिंदे बगदादी यांची हत्या केली असून आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत.
5. कट्टर इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही दोघे एकत्र काम करू.
6. आम्ही पाकिस्तानसह मिळून सीमेच्या पलीकडे असलेला दहशतवाद रोखण्याचा प्रयत्न करू. प्रत्येकाला आपल्या देशाच्या सुरक्षेचा अधिकार आहे.
7. इस्रोच्या चंद्रयान मिशनचा उल्लेख करत अमेरिका आणि भारत अंतराळातील मित्र आणि भागीदार बनतील, असे म्हणाले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली इस्रोने एक मोठे काम केले आहे.
8. मी पंतप्रधान आणि मोदी यांच्याशी भारत आणि अमेरिकेमधील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहे. पण पंतप्रधान मोदी हे चांगली तडजोड करत असून त्यांच्याशी बोलणी करून आपण व्यापार कराराकडे वाटचाल करणार आहोत.
9. कट्टर इस्लामिक दहशतवादापासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करू.
10. महान धार्मिक शिक्षक स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते की, ज्या क्षणी मी प्रत्येक मनुष्यासमोर उभा राहतो त्याच्यामध्ये देवाचे दर्शन होते, त्या क्षणी मी मुक्त होतो. भारत आणि अमेरिकेचा जन्म एका मोठ्या हेतूने झाला आहे.