मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महागाईचा काळात लोकांना घर चालवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. गरजेच्या वस्तूंचे भाव देखील वाढले आहेत. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यामुळे सामान्य लोकांच्या खिश्यावर जास्त भार येणार नाही. जीएसटी कौन्सिलने लोकांच्या हितार्थ करामध्ये कपात केली आहे आणि हे नवे दर उद्या पासून लागू होतील. १ ऑगस्ट २०१९ पासून म्हणजेत उद्यापासून लोकांना महागांई पासून दिलासा मिळणार आहे. याचा परिणाम आता थेट सामान्य जनतेवर होणार आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या किमती देखील कमी होतील.
१. स्वस्त होणार इलेक्ट्रिक कार –
ऑगस्ट २०१९ पासून हे दर लागू होतील. अर्थ संकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्ट्रिक वाहनाच्या करात कपात केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. जीएसटी कौन्सिलने आपल्या ३६ व्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांवर लावण्यात आलेला जीएसटीचा दर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के केला आहे. उदाहणार्थ, १० लाख रुपयांच्या इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर जीएसटीनंतर तुम्हाला ७० हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल.
२. एसबीआयच्या सेवेवर होणार परिणाम –
जे ग्राहक एसबीआयच्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग पेमेंटसारखे काम करु शकल तेही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय. सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआयच्या ग्राहकांना लाभ व्हावा म्हणून आयएमपीएस चार्जला रद्द केले आहे, आता हा बँकेचा निर्णय उद्या पासून लागू होईल. याशिवाय एसबीआयने आरटीजीएस बरोबरच एनईएफटीवर लावलेल्या शुल्काला देखील बंद केले आहे.
३. स्वस्तात खरेदी करा घर –
ज्या लोकांना नोएडा किंवा ग्रेटर नोएडामध्ये घर विकत घ्यायचे आहे त्यांचासाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेशच्या नोएडा मध्ये प्रॉपर्टी सर्किल रेटमध्ये कपात झाली आहे. हा दर जवळपास 6 टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारने २५ टक्के सरचार्ज देखील रद्द केला आहे.उत्तर प्रदेशच्या नोएडा मध्ये प्रॉपर्टी सर्किल रेटमध्ये कपात झाली आहे. हा दर जवळपास 6 टक्क्यांनी कमी झाला आहे. सरकारने २५ टक्के सरचार्ज देखील रद्द केला आहे.