मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेल्या कंगना राणावतने मुंबई पोलिसांवर टीका केली. तसेच मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केल्यानंतर ती टीकेच्या रडावर आली आहे. कंगनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तीच्यावर टीका केली. आता भाजपचे नेते आणि माजी खासदारांनी तिला कडक शब्दात समज दिली आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये कंगना सुरुवातीपासून वेगवेगळी वक्तव्य करत आहे. सुरुवातीला तीने सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील घराणेशाही व कंपूशाहीला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर तीने राजकीय नेते आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला होता. नेते आणि मुंबई पोलिसांवर कंगनाने टीका केली. सुशांत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर कंगनानं बॉलिवूड व ड्रग माफियांमधील संबंधाची माहिती देण्याची तयारी दर्शवली होती. तिला मुंबई पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली होती.
मुंबई पोलिसांची भीती वाटते – कंगना
राम कदम यांनी कंनाला मुंबई पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर कंगनाने राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. यामध्ये तीने मुंबई पोलिसांवर कडवट टीका केली होती. गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज, असं तिने म्हटले आहे.
2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 3, 2020
चंबूगबाळं आवरून निघून जा- राऊत
कंगनाने राम कदम यांना रिप्लाय दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीला चांगलच सुनावलं आहे. चंबूगबाळं आवरून निघून जा, असं त्यांनी सुनावलं. तर कंगनाला राम कदम यांचीच भीती वाटली पाहिजे, अशी खोचक टीका केली होती. त्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनी कंगनानं मुंबई पोलिसांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान – नीलेश राणे
काही अधिकारी दबावाला बळी पडले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी ठरत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी कंगना राणावत कोण लागून गेली ? सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडले जावेत असे आमचंही मत आहे. त्यासाठीच्या मागणीला आमचा पाठिंबाच आहे, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा नीलेश राणे यांनी कंगनाला दिला आहे.