बहुजननामा ऑनलाइन टीम – नरभक्षक वाघाला व बिबट्याला बेशुद्ध करून पकडले जाते किंवा पिंजऱ्यात बकरीचे आमिष दाखवून जेरबंद करण्यात येते. राजुरा तालुक्यात दहा जणांचे बळी घेणारा आर टी -१ वाघ या प्रयोगाला कसलाच प्रतिसाद देत नव्हता. तेव्हा वनविभागाने(forest department) चक्क बकरीऐवजी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांनाच पिंजऱ्यात बसवल्याचा प्रकार घडला आहे. पिंजऱ्यात कोण किती वेळ बसणार याचे वेळापत्रक चक्क वनविभागाकडूनforest department() तयार करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते सकाळी ८ असे तब्बल १४ तास त्यांना पिंजऱ्यात बसवण्यात येते.
राजुरा वनक्षेत्रात ११ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर पर्यंत हा प्रकार राबवण्यात येणार आहे. हा प्रायोग गेल्या ६ दिवसांपासून राबविला जात आहे. तरीसुद्धा हा वाघ पिंजऱ्यात असलेल्या वनपाल, वनरक्षक वा वनमजुराजवळ फिरकला देखील नाही. राजुरा वनक्षेत्रात आरटी-१ या वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाने आतापर्यंत १० लोकांचा जीव घेतला आहे. त्या वाघाचा बंदोबस्त करा नाहीतर त्याला ठार मारा असा दबाव शेतकऱ्यांनी व राजकीय मंडळींनी वनविभागवर टाकला आहे. वाघ पिंजऱ्यात येत नाही तसेच तो शॉर्प शूटरच्या निशाण्यावरही येत नसल्याने वनविभाग हतबल झाला आहे. त्यामुळे वनविभागाने बकरीऐवजी वनपाल, वनरक्षक व वनमजुराला पिंजऱ्यात बसवण्याचा निर्णय घेतला.
हा प्रयोग तसा जुनाच : – एन. आर. प्रवीण
बिबट्या विहिरीत पडला किंवा वाघ जखमी अवस्थेत असला कि त्याला बेशुद्ध करण्यासाठी मनुष्याला पिंजऱ्यात बसवून जवळ नेले जाते. त्यानंतर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वनविभागात एका जखमी वाघाची जवळून माहिती घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता अशी माहिती मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्याकडुन देण्यात आली आहे.