नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणातील 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आल्यानंतर 3 आरोपींना 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा तर 3 अन्य आरोपींना अजीवन कारावासाची शिक्षा न्यायालायाकडून सुनावण्यात आली आहे. सांजीराम, दिपक खजुरिया, प्रवेश कुमार यांना अजीवन कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. तर सुरेंद्र कुमार, आनंद दत्ता, तिलक राज यांना 5-5 वर्ष अशी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पठानकोट न्यायालयाने 100 पेक्षा आधिक सुनावणी आणि 130 पेक्षा आधिक साक्षीदारांचा जबाब नोंदवत आरोपींना ही शिक्षा सुनावली आहे.
कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी 7 मधील 6 आरोपींनी दोषी ठरवण्यात आले आहे. आता त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार होती. त्याचा निर्णय येण्याआधी पीडितेच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. घटनेला इतके दिवस झाले तरी अजून आरोपींना शिक्षा न झाल्याने पीडितेच्या आईने खंत व्यक्त केली आहे.
त्यानंतर आता दीड वर्षांनंतर या प्रकरणाचा निर्णय झाला आहे. ज्या 6 आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते, त्यात ग्रामप्रधान सांजी राम हा मुख्य आरोपी होता. तसेच दिपक खजुरिया, प्रवेश कुमार, तिलक राज, आनंद दत्ता, सुरेंद्र कुमार यांचा समावेश होता. तर यात आरोपी असलेल्या विशाल या सांजी राम याच्या मुलाला निर्दोष सोडण्यात आले आहे. सुरुवातीला ह्या प्रकरणी जम्मू न्यायालयात सुनावणी करण्यात येणार होती परंतू नंतर पठानकोट न्यायालयात या प्रकरणी सुनावणी करण्यात आली, तेथूनच हा निर्णय देण्यात आला.
10 जानेवारी 2018 साली जम्मू काश्मीरमध्ये कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपुर्ण देशात रोषाचे वातावरण होते. या घटनेला संपुर्ण मिडियाने उचलून धरले होते. त्या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी देशभरातील लोकांनी ठिकठिकाणी कैंडल मार्च काढला. परंतू घटनेला दीड वर्ष होऊन गेले तरी न्याय मिळत नसल्याने पीडितेच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.