फरुखाबाद : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील कठरिया गावात २३ मुलांना ओलीस ठेवणारा माथेफिरु सुभाष बाथम याला उत्तर प्रदेश पोलीस आणि एटीएसच्या पथकाने केलेल्या गोळीबारात ठार करण्यात आले आणि सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष बाथम याने गुरुवारी दुपारी मुलीचा वाढदिवस असल्याचे खोटे सांगून २३ मुलांना घरी बोलावले. त्यानंतर त्याने त्यांना घरातल्या बेसमेंटमध्ये कोंडून ठेवले.याचबरोबर त्याने आपली पत्नी आणि मुलाला पण कोंडून ठेवले. दोन वर्षांपूर्वी सुभाष बाथम याने एका नातेवाईकाची हत्या करून त्याची जामीनावर सुटका झाली होती. आपल्या मुलाला घेण्यासाठी एक महिला त्याच्या घरात जाण्याचा प्रयत्न करीत असताना हा प्रकार उघड झाला.
UP DGP OP Singh: The operation ran for around 8 hours. We tried to engage him constructively through talks but we got information that he had firing capability and there was possibility that he had explosives in his possession. He was threatening to carry out a blast. https://t.co/QMcp8pD9k0 pic.twitter.com/Nit6XlJgl2
— ANI UP (@ANINewsUP) January 30, 2020
मुलांना ओलीस ठेवल्याचे समजल्यावर लखनौहून एटीएसचे एक पथक व जिल्हा पोलिसांचे पथक गावात आले. सुभाषला तेथील आमदारांशी बोलायचे होते. सुभाषकडे रिव्हॉल्व्हर असून त्याने मुलांना ओलीस ठेवल्यामुळे पोलिसांना काहीही करता येत नव्हते. आमदारांना बोलावण्यात आले पण त्यांच्याशी बोलन्यास त्याने नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या एका नातेवाईकाला त्याच्याशी बोलण्यासाठी घरात पाठविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने रागाने त्याच्यावर गोळीभार करुन त्याला जखमी केले. आपल्या मागण्या एका कागदावर लिहून तो कागद त्याने घराबाहेर फेकला होता. तो कागद जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.
या घटनेनंतर एटीएसचे एक पथक पुढे सरसावले त्या पथकाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुभाष बाथम याने घरातून ६ गोळ्या झाडल्या. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीभार केला त्यात सुभाष बाथम याला ठार करण्यात आले. सुमारे १० तास हे ऑपरेशन सुरु होते. मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सुभाष ठार झाला. ही घटना समजल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोलिसांशी संपर्कात होते.ऑपरेशन मासुम यशस्वी करणाऱ्या पोलीस पथकाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.