मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – युतीच्या सरकारने २०१४ ला सत्तेत येताना सगळ्या घटकातील लोकांचा विचार करू आणि शेतकऱ्यांचा प्रश्नांना प्राधान्य देऊ असे म्हणणाऱ्या सरकारच्या काळातच सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. सत्तेत आल्यापासून २०१४ ते २०१९ या काळात विदर्भात तब्बल ५६८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विशेष म्हणजे हा सरकारी आकडा आहे प्रत्यक्षात हा आकडा अधिक असू शकतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
२०१४ साली मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते मुख्यमंत्री त्या आश्वासनांची पूर्तता का करत नाहीत? तसेच सरकार आल्यापासून दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत.असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.