बहुजननामा ऑनलाईन टीम : ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली असून आता दोन लाखावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पॅकेज देणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सरकारकडून सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात याबद्दल निर्णय घेतला जाणार असून त्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ही माहिती गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी दिली. काही तज्ञांनी मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भाजप सरकारने जाहीर केलेली वॉटरग्रीड योजना आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
त्यामुळे ही योजना तपासली जाणार आहे. येत्या अर्थसंकल्पात वॉटरग्रीडसाठी कुठलीही तरतूद केली जाणार नसून ही योजना करण्याबाबतची परिस्थिती असेल तर येत्या पावसाळी अधिवेशनात यासाठी तरतूद करता येईल असेही पवार म्हणाले.