नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन : सोमवार पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवाशनाचा बुधवारी तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांशी संबंधित तीन अध्यादेशांवरून शेतकरी संघटनांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकरी संसदेच्या बाहेर केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. भारतीय किसान यूनियनशी संबंधित शेतकरी संसदेबाहेर आंदोलन करणार आहे. या आदोलनामध्ये महाराष्ट्र, तेलंगना, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती भारतीय किसान यूनियनचे नते गुरनाम सिंह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिली.
पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकरी शेती संदर्भातील तीन अध्यादेशांचा विरोध करण्यासाठी आज संसदेबाहेर धरणं आंदोलन करणार आहेत. याचबरोबर पंजाबमधील भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या शिरोमणी अकाली दलही या अध्यादेशांवर नाराज असल्याच दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरोमणि अकाली दल या अध्यादेशांच्या विरोधात मतदान करणार आहे.
बंदारावरील कंटेनरच काय करायचं ?
केंद्र सरकारने निर्यात बंदीचा अचानक निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे. सध्या बंदरावर 712 कंटेनेरमध्ये कांदा आहे. मात्र, केंद्राच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे हे सर्व कंटेनर बंदरावर उभे आहेत. या कंटेनरमध्ये 1 किलोपासून 50 किलोपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारचे कांदे पँकिंगमध्ये आहेत. वेळेवर कांदा निर्यात झाला नाहीतर कांदा खराब होण्याची शक्यता आहे. एका कंटनेरची किंमत 8 ते 10 लाखादरम्यान आहे. हा कांदा निर्यात झाला नाही तर होणाऱ्या नुकसानाचा भूर्दंड निर्यातदारांच्या माथी येईल. काँग्रेसने आज या निर्यात बंदी विरोधात आंदोलन करणार आहे.
या अध्यादेशांना होत आहे विरोध ?
शेतकरी सुधारणा कार्यक्रमांतर्गत लागू करण्यात येणाऱ्या आणि शेतकऱ्यांची मिळत वाढवण्याच्या दृष्टीने तीन अध्यादेश आज सरकार मांडणार आहे. हे तीनही अध्यादेश सोमवारी लोकसभेत मांडण्यात आले. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020 आणि कृषी (सवलीकरण आणि संरक्षण) हमीभाव करार आणि कृषी सेवा विधेयक 2020 लोकसभेत मांडले. तर आवश्यक वस्तू (संशोधन) विधेयक 2020 हे खाद्य तसेच सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडले.