शिर्डी : बहुजननामा आॅनलाइन – येत्या ११ जानेवारीला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेवून देशभरातील चार लाख शेतकरी दिल्लीत जावून सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा निर्धार शिर्डीत झालेल्या शेतकरी संघटनेच्या १४ व्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला. येथे शरद जोशी प्रेणीत शेतकरी संघटनेच्या तीन दिवसीय १४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाची राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या उपस्थीतीत सांगता झाली.
माजी खा. भुपेंद्रसिंग मान, माजी आ.वामन चटप, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता खांदेवऱ्हाड, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, युवा आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यु शेलार, बापूसाहेब शेलार, देवीदास पवार आदी प्रमुख शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.
येथे शरद जोशी प्रेणीत शेतकरी संघटनेच्या तीन दिवसीय १४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाची राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या उपस्थीतीत सांगता झाली. माजी खा. भुपेंद्रसिंग मान, माजी आ.वामन चटप, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गीता खांदेवऱ्हाड, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, युवा आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यु शेलार, बापूसाहेब शेलार, देवीदास पवार आदी प्रमुख शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थीत होते.
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकुन टिका केली. ते म्हणाले आजवरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुका कृषीधोरणावर झालेल्या नाही. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक ही फक्त देशाच्या कृषी धोरणावर व्हावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होणार आहे. यासाठी गावपातळीवरील शेतकऱ्यांनी संघटीत होवून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना व मंत्र्यांना गावात आल्यावर या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी करावी.
प्रसंगी जेल भरो आंदोलनही करण्याची आमची तयारी आहे. आजवर भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेच्या माध्यमातून समाजवादाला प्राधान्य दिल्याने देशातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. देशातील शेतकरी आणी शेती समृद्ध होण्यासाठी स्वतंत्रवादी अर्थव्यवस्था स्विकारण्याची गरज आहे. स्वतंत्रवादी अर्थव्यवस्थेमुळे आज सिंगापूरसारख्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
अच्छे दिनच्या मुद्यांवर निवडणूका लढवणारे सरकार कृषी धोरणावर निवडणूका घेण्यास का धजावत नाही? असा सवाल करित केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाग आणण्यासाठी शेतकरी संघटना यापुढे अधिक आक्रमक राहाणार आहे. येत्या ११ जानेवारीला देशातील सुमारे चार लाख शेतकरी दिल्लीत जावून झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करण्याचे काम करणार आहे. साडेचार वर्षात शेतकऱ्यांना अच्छे दिन पाहायला मिळाले नसल्यानेच चार राज्यात भाजपाच्या सरकारला शेतकऱ्यांनी सपाटून मार दिला आहे,असेही ते शेवटी म्हणाले.