मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ठाकरे यांच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ चा अध्यादेश काढला असून त्या योजनेमध्ये व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची फसवणूक करत असून त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा देण्याचा निर्णय चुकीचा आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे ९४ लाख हेक्टरी पीक वाया गेले. उद्धव ठाकरे हे भाजपसोबत सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन २५ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी प्रति हेक्टर ५० हजार रुपये द्यावे, असे म्हणत होते. त्यांची हीच मागणी आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये करत होते, असेही पाटील यांनी सांगितले.याआधीच्या सरकारने २००१ ते २०१६ पर्यंतची दीड लाखांची कर्जमाफी केली असून आत्ताचे सरकार कोणाची कर्जमाफी करणार, असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपने केलेल्या कर्जमाफीचे निकष लावल्याची टीका केली. पण आता करण्यात आलेल्या कर्जमाफीवर देखील निकष लावले आहेत. निकष लावणे गरजेचे असून आम्ही लावलेले निकष चुकीचे आणि आता ते बरोबर असा टोमणाही पाटीलांनी मारला आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करतो, असे आश्वासन ठाकरे यांनी केले होते. ठाकरे यांनी हे आश्वासन पूर्ण केले नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. सरकारने घाईगडबडीत निर्णय न घेता सगळी माहिती घेऊनच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. अजूनही वेळ गेलेली नसून पुन्हा एकदा विचार करून कर्जमाफीच्या योजनेत बदल करावा, अशी विनंतीही राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Visit : bahujannama.com