नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Farm Laws | गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. या आंदोलनाला आता मोठे यश आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला (Repeal All 3 Farm Laws). देशवासीयांना संबोधित करताना मोदीं यांनी हा निर्णय घोषित केला आहे. शेतकर्यांनी त्यांच्या घरी जावे. शेतात जाऊन काम सुरु करावे. एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गेल्या ७ वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रथमच अशा प्रकारे एकदा घेतलेला निर्णय बदलला आहे. पोटनिवडणुकीत भाजपाला फटका बसल्यानंतर मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर मागे घेतला होता. त्यानंतर आता पंजाब, उत्तर प्रदेशातील निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
शेतकर्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला होता. आंदोलनात फुट पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेतकरी दिल्लीच्या सीमेवर टिकून राहिल्यानंतर मोदी सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे.
web title : Farm laws pm narendra modi announces repeal all 3 farm laws farmer protest modi government.
Gold-Silver Price Today | सोन्याच्या दरात उसळी, चांदी झाली ‘स्वस्त’; जाणून घ्या 1 तोळ्याचा दर