मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील राजकारण सचिन वाझे त्यानंतर रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. सचिन सावंतांना काही समजत का? त्यांना मी काय उत्तर देणार.
रोज काही न काही तरी ते बोलत असतात. त्यामुळे काहीही बोलणाऱ्याना मी थोडेच उत्तर देणार. त्यांना उत्तर देण्यास राम कदम समर्थ आहेत अशी टीका सावंत यांच्यावर केली होती. त्यावर आता सचिन सावंत यांनी ट्विटर वर प्रत्युत्तर दिले आहे. आदरणीय फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे. मात्र, माझी विश्वासार्हता ही फडणवीस यांच्यापेक्षा कांकणभर जास्त आहे, असे त्यांनी म्हटलंय.
नवाब मलिक यांनीच अहवाल फोडला
वाझे प्रकरणाने महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. वाझेकडे ज्यांनी केसेस दिल्या त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली आहे. आणि तेच आता प्रश्न विचारत आहेत. उरला फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे त्याचा. या अहवालामुळे अनेक लोकांचे बिंग फुटणार आहे. केवळ मी पहिली दोनच पान दिली होती. त्यावरून नवाब मलिक आणि त्यांचे साथीदार इतके घाबरले आहेत कि वाझे काय बोलतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.