नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने नव्या गाईडलाईनचा स्वीकार करण्यासाठी Facebook, Twitter आणि Instagram यांसारख्या समाजमाध्यमांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे २५ मेपर्यंतची दिलेली मुदत संपुष्टात आलीय. यामुळे केंद्र सरकार समाजमाध्यमांवर बंदी आणू शकते. भारतामध्ये Facebook, Twitter आणि Instagram हे माध्यमे बंद होणार असल्याच्या चर्चवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले, भारतात फक्त ‘कू’ या समाजमाध्यम ॲपनेच नव्या गाईडलाईनचा स्वीकार केला आहे. सरकारच्या गाईडलाईनचा स्विकार न केल्यामुळे अन्य समाज माध्यमांवर टांगती तलवार आहे. परंतु, Facebook ने केंद्राकडे ६ महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. म्हणून, तोवर Facebook बंद होण्याची शक्यता कमीच आहे. असे पाटील यांनी सांगितले. यावरून जयंत पाटील यांनी Facebook आणि Twitter वर बंदी येणार का? असा प्रश्न करत पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरुन समाज माध्यमांने उठवलेला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही ना, असे संकेत त्यांनी दिले आहेत. तर, Facebook आणि Twitter पुढचा नंबर कोणाचा? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स काय आहेत ?
माहिती तंत्रज्ञान कायद्यात केंद्र सरकारने फेब्रुवारी मध्ये नव्या गाईडलाईन्स लागू केली. त्यांचा स्वीकार करण्यासाठी Facebook, Twitter आणि Instagram यांसारख्या सोशल मीडियानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे २५ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मुदत संपल्याने अद्याप वरील तीनही समाजमाध्यमांनी नव्या गाईडलाईन्सचा अंगीकार केलेला नाही. म्हणून भारतीय कायद्याचे पालन करण्यात असमर्थ ठरल्याप्रकरणी या सर्व समाजमाध्यमांवर फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार केंद्र वापरू शकते.
Facebook ने मागितली मुदत –
Facebook आणि Twitter यांनी आम्ही केंद्राकडे ६ महिन्यांची मुदत मागितली असल्याचे सांगण्यातबा आले. केंद्राच्या नव्या गाईडलाईन्सचे पालन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र, काही मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करणे गरजेचं आहे. नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठीची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून थोडा काहीं काळ लागणार आहे. असे Facebook च्या प्रवक्त्याने सांगितला आहे.