नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणार्यांना नेहमी नोकरी जाण्याची भिती असते. जर कोणत्याही कारणामुळे तुमची नोकरी सुटली तर जास्त अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण आता तुमची नोकरी सुटली तरी तुम्हाला घर बसल्या 24 महिन्यांसाठी सॅलरी मिळेल. प्रायव्हेट नोकरी करणार्यांसाठी कर्मचारी राज्य वीमा महामंडळाने (ईएसआयसी) मोठे पाऊल उचलले आहे. ईएसआयसीने सांगितले की, तुमची नोकरी गेल्यास अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना अंतर्गत सरकार तुम्हाला आर्थिक मदत देते. ईएसआयसी रोजगारातील अनैच्छिक नुकसान किंवा रोजगार नसल्याने होणार्या नुकसानामुळे येणार्या अडचणीच्या प्रकरणात 24 महिन्यांच्या कालावधीसाठी तुम्हाला रोख रक्कम देते.
कसा घ्याल फायदा ?
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ईएसआयसीच्या अटल वीमाधारक व्यक्ती कल्याण योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. तुम्ही ईएसआयसीच्या बेवसाइटवर जाऊन अटल वीमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा फॉर्म डाउनलोड करू शकता. तो भरून तुम्हाला ईएसआयसीच्या कोणत्याही ब्रांचमध्ये जमा करावा लागेल. या फॉर्मसोबत 20 रुपयांचा नॉन-ज्यूडिशियल पेपरवर नोटरीकडून अॅफिडेव्हिट करावे लागेल. यामध्ये एबी -1 पासून एबी -4 फॉर्म जमा करावे लागतील. ऑनलाइन सुविधा यासाठी सुरू होणार आहे. आणखी माहितीसाठी तुम्ही www.esic.nic.in या वेबसाइटवर जाऊ शकता. लक्षात ठेवा याचा फायदा तुम्ही फक्त एकदाच घेऊ शकता.
यांना नाही मिळणार योजनेचा फायदा
ईएसआयसीच्या नियमानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक मानदंड तयार करण्यात आला आहे. ईएसआयसीचा वीमा असलेली कोणतीही व्यक्ती ज्यास कोणत्याही कारणामुळे कंपनीतून काढले जाते किंवा त्या व्यक्तीवर एखादा गुन्हा नोंद होतो, तर अशा व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच जे लोक स्वेच्छा निवृत्ती घेतात, त्यांनाही याचा लाभ मिळत नाही.
Visit : bahujannama.com