नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून ऊर्जा विभागातील वेगळ्या समित्यांवरील अशासकीय सदस्यांचा नियुक्त्या रद्द करणार असल्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. राज्याच्या ऊर्जा विभागातील विविध समित्यांवर तज्ञ सदस्यांच्या नावाखाली राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींची वर्णी लावण्यात आली असता अशासकीय सदस्य म्हणून ऊर्जा विभागात या खासगी व्यक्तींचा मोठा हस्तक्षेप सुरु होता.
त्यातील बरेच जण भाजपच्या नेत्यांच्या जवळचे लोकं होते. राज्याचे मुख्यमंत्री नितीन राऊत यांनी मध्यंतरी घेतलेल्या ऊर्जा खात्याच्या आढावा बैठकीत अशासकीय सदस्यांचा नियुक्त्यांची माहिती त्यांनी घेतली होती. या खात्याच्या समित्यांवर अनेक खासगी व्यक्तींनी अशासकीय सदस्य म्हणून वर्णी लावली होती. पण आता राज्यातील सरकार बदलले असून अशासकीय सदस्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन बाहेर पडावे. नाहीतर सरकार कारवाई करेल, असा इशारा दिला होता.
पण तरीही काही अशासकीय सदस्य या समित्यांवरून पायउतार झाले नाहीत. तर याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना संपर्क साधल्यावर राज्यातील सरकार बदलले आहे. त्यामुळे अशासकीय सदस्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्याचे निर्देश लवकरच जारी होतील, असे म्हणाले.