कोलकाता वृत्तसंस्था – महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरेंनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यावेळी निवडणूकांमध्ये ईव्हीएम नको, तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूका घ्या असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.तर केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
माझा सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावरचा विश्वासच उडाला आहे असे राज ठाकरे म्हणाले. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता राजकिय मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला गेला. त्यानंतर निवडणूका बँलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज ठाकरे यांनी यापुर्वी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने त्यांनी टाकलेलं हे पुढचं पाऊल समजलं जात होतं. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडेही यासंदर्भात बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी केली.
२०१४ पुर्वी भाजपनेदेखील ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली होती. परंतु त्यानंतर त्यांचा सूर बदलला आहे.मात्र निवडणूक आयोगाने आपल्याला शून्य अपेक्षा असल्याचे राज ठाकरे म्हणाले. तर निवडणूक आयोगाला भेटलात का असं तुम्ही विचाराल म्हणून सांगतो निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांकडे पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे. असेही ते पत्रकारांना म्हणाले.