कल्याण : बहुजननामा ऑनलाईन – घरातील मोठ्या मुलीच्या लग्नाची तयारी तिच्याआईनं केली. तिला लग्न करायचं नव्हतं तिला शिकायचं होतं. तिने तिच्या दोन धाकट्या बहिणीसह घरातून पळ काढला. पोलिसांनी मोठ्या प्रयत्ननाने या तिघा बहिणींना शोधून काढलं. या तिघींना तिच्या आईच्या ताब्यात देऊन त्यांच्या आईला दिवाळीची अनोखी भेट दिली.
कल्याण पूर्वेत येथे राहणारी एक महिला आहे. तिला तीन मुली आहेत. त्या मुलांचे वडील हयात नसल्याने आईच तिघींचा सांभाळ करते. या तिघी मुली अचानक घरातून गायब झाल्या. त्यांच्या आईला मोठा धक्का बसला. मात्र, तिने खचून न जाता थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठलं. त्या ठिकाणी तिने पोलिसांना सगळी हकिगत सांगितली. तिच्या तीन मुली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली. तपासाला गती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज साळवे यांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी एक तपास पथक नेमले. या तपास पथकाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ यांच्यावर सोपवली. पोलिसांनी मुलींचा तपास सुरू केला.
मुलींचा मोबाईल ट्रॅकवर ठेवला तसेच मुली ज्या व्यक्तीच्या संपर्कात आहेत त्या व्यक्तीच्या संपर्कात पोलीस होते. हे मुलींना ठाऊक नव्हतं. मुलींच्या सोबत काही अनुचित प्रकार घडू नये अशी धास्ती मुलीच्या आईला व पोलिसांनाही होती. मुलीच्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या ती व्यक्ती त्या मुलींना घरी परत येण्यासाठी समजावीत होती. या व्यक्तीच्या माध्यमातूनच मुली पनवेल बस स्थानकत आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी या मुलींना पनवेल बस स्थानकात गाठले. त्यांना कल्याणला आणलं. तिघींना पोलिसांनी त्यांच्या आईच्या हवाली केलं. पोलीस निरीक्षक वाघ यांनी सांगितलं, की मोठ्या मुलीच्या लग्नाची तयारी तिच्या आईने सुरू केली होती याची चाहूल तिला लागली तिला लग्न नको होतं तिला शिकायचं होतं त्यामुळे मी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तिच्या धाकट्या बहिणी तिच्यासोबत जाण्याचे ठरले कारण त्या तिघी एकमेकीशिवाय राहू शकत नव्हत्या.