एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, गेल्या अडीच वर्षात म.वि. आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविणासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
दरम्यान, काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बंडखोर म्हणून चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी अचूक ट्विट केले. शिंदे यांचे हे दिवसभरातील तिसरं ट्विट असून, यामध्ये त्यांनी चार मुद्यांमध्ये भावना व्यक्त केल्या आहेत.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
Web Title :- Eknath Shinde | shivsena leader eknath shinde news tweet says now its time to do for maharashtra