बहुजननामा ऑनलाइन टीम – गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ते लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. पण या सर्व शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी फेटाळून लावल्या आहेत. नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे (Eknath Khadses)ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाच नुकसान होईल, असे ते वागणार नाहीत, त्यांची मनधरणी सुरु असल्याचे वक्तव्य ((Chandrakant Patil on Eknath Khadse Join NCP)) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना धावता प्रवास करण्याची गरज नाही. अशा कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. पंचनामे करण्याचीही गरज नसल्याचे पाटील म्हणाले. प्रत्येक वेळी केंद्राकडे पाहयच नसत. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करावी. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. केंद्र सरकारकडून जे मिळेल ते बोनस समजावे असा टोलाही त्यांनी लगावला.
म्हणून त्यांना मुख्यमंत्र्याची भलामण करावी लागतेय
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल माझ्या मनात कायम आदर आहे. पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागत आहे. सरकार एकत्रं चालवायचं आहे म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांची भलामण करावी लागत आहे. याचं वाईट वाटतं. बाबा, या वयात मी इतका फिरतो तू किमान घराबाहेर पड, असं कादाचित पवारांना म्हणायचं असेल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी ते गेले आहेत. विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते शेतकऱ्यांना भेटत आहेत, असं ते म्हणाले.