मुक्ताईनगर : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) त्यांच्या आमदारांना घेऊन लवकरच पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. त्यांना कामाख्या देवीला केलेला नवस पूर्ण करायचा आहे, म्हणून ते गुवाहाटीला जाणार आहेत. अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. मात्र राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) मात्र त्यांच्या या दौऱ्याची टीका केली. एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) एका कवितेमार्फत (Poem) या दौऱ्याची टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
‘जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे 40 खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे.’ अशी चक्क कविताचं करत एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) शिंदे गटाच्या दौऱ्यावर टोला लावला आहे.
एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या अंतुरली गावात जनसंवाद यात्रेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
तेव्हा त्यांनी ही कविता ऐकवली. येत्या 21 नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्व आमदार, एकनाथ शिंदेंसह गुवाहाटीला
(Guwahati) जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्री शिंदेनी कामाख्या देवीच्या
(kamakhya Devi) दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असा नवस देवीला बोलला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Eknath Khadse | eknath khadses reaction on eknath shindes again visit to guwahati with 40 mla
हे देखील वाचा :