नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले असून देशाच्या विकासावर देखील याचा परिणाम झाला आहे. असा घणाघात माजी पंतप्रधान मनोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे. मागील तीन महिन्यांपासून जीडीपी दर ५ टक्के आहे , त्यामुळे देशाच्या आर्थिक मंदीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला आहे.
Our economy has not recovered from the man made blunders of demonetisation & a hastily implemented GST… I urge the govt to put aside vendetta politics & reach out to all sane voices to steer our economy out of this crisis: Former PM Dr Manmohan Singh #DrSinghOnEconomicCrisis pic.twitter.com/83cBJWHay9
— Congress (@INCIndia) September 1, 2019
मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी तसेच जीएसटी सारख्या धोरणांमुळे देशाला आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. उत्पादन क्षेत्रात ०. ६ टक्के प्रगती आहे. आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली आहे. गुंतवणुकीच्या घसरणीमुळे अनेकांना आपल्या आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये प्रगती करण्याची क्षमता असून देखील मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आर्थिक मंदी भेडसावत आहे, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली.
‘गेल्या १५ वर्षात जीडीपी च्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. महसुलात तसेच मागणी आणि पुरवठा यातील प्रगती देखील गेल्या १८ महिन्यांच्या खालच्या स्तरावर आहे. अनेक छोट्या व्यापारांपासून मोठ्या व्यापारापर्यंत अनेकांमध्ये करप्रणालीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उदासीनता आहे. तसेच वाहन क्षेत्रातील अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहे. त्यात ३ लाख ५० हजार कामगारांना बेजोजगारीला सामोरे लागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाची घर उध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील या परिस्थितीला सामोरे लागले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळत नाहीये. त्यामुळे उत्पन्नात घाट होत आहे,’ असा आरोप मनमोहन सिंग यांनी केला आहे.
दरम्यान, सरकारला जागतिक बाजारातील उपलब्ध संधीचा फायदा करून घेता आला नाही, त्यामुळे सरकारवरून लोकांचा विश्वास कमी झाला आहे, असे देखील मनमोहन सिंग म्हणाले. तसेच योजनांच्या नावाखाली मोदी सरकारने आरबीआय कडून घेतलेले १ लाख ७६ हजार कोटी रुपये कोणत्या योजनांसाठी आहेत ? असा प्रश्न देखील मनमोहन यांनी उपस्थित केला.