जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – भीमा कोरेगावच्या घटनेमुळे दलित समाज भाजपा, शिवसेना व काँग्रेसच्या विरोधात गेलेला आहे. त्यामुळे हा समाज वंचित आघाडीकडे वळला आहे. त्यांच्याशी चर्चा सुरु होती, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसकडे प्लॅन नसल्याने चर्चा थांबविली असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ॲड. आंबेडकर म्हणाले, ओबीसी व मराठा आरक्षणामुळे सामाजिक स्थितीला तडा गेला असून ही स्थिती मिटविण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र ते होत नाही. ओबीसी समाजामध्ये सत्तेच्या जागी झालेली ईषा भाजपा सेनेला धोकादायक असून बहुजन समाज व मुस्लिम समाज वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने असल्याने आमचे पारडे जड आहे. सद्यस्थिती लक्षा घेता काँग्रेसने माझं परिक्षण मानलं असत तर त्यांचा फायदा झाला असता. काँग्रेस पक्ष आयसोलेट झाला असून त्यांच्याकडे मित्र पक्ष नाही. आरएसएस मुळे मुस्लिम समाजात भिती असून आरएसएसला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी झाले पाहिजे. काँग्रेसकडे याबाबत प्लॅन नसल्याने चर्चा थांबवित आम्ही आघाडीसाठी लोकसभा, विधानसभेसाठी उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसने आमचे विचार मान्य केल्यास पुन्हा चर्चा सुरु करत १२ जागांची मागणी राहील. त्यात ज्या जागा गेल्या तीन निवडणुकांमध्ये गमविलेल्या आहेत त्या जागांचा समावेश राहील. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा भाजपाला अप्रत्यक्ष फायद होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता दलित व मुस्लिम समाज शिवसेना व भाजपाच्या विरोधात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बिनबुडाचा लोटा असून त्यांच्याबद्दल न बोललेले बरं अस म्हणत आघाडीचा सर्वाधिक फटका भाजपाला बसेल असे उत्तर त्यांनी दिले.