मुंबई बहुजननामा ऑनलाईन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्यासोबतच या मालिकेच्या टीमने आता एक स्तुत्य उपक्रम राबवून पर्यावरण रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचाच पहिला प्रयत्न म्हणजे दशमी प्रॉडक्शन आणि कलाकारांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद केला आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्यांचा वापर सुरु केला आहे.
या उपक्रमाविषयी सांगताना तुळसाची भूमिका करणारी आदिती द्रविड म्हणाली की, प्लास्टीकची समस्या गंभीर झाली आहे. हे सर्वांनाच माहित आहे. सुशिक्षित आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्याला या गोष्टीची जाणीव असायला हवी. या बदलाची सुरुवात होणे गरजेचे आहे. ही सुरुवात करण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली याचा आनंद आहे. आम्हाला आमचं आणि व्यक्तिरेखेचं नाव लिहिलेल्या बाटल्या दशमी प्रॉडक्शनकडून देण्यात आल्या आहेत. हा प्रयत्न इतरांना प्रेरणा देईल. याची खात्री आहे.