पुणे : बहुजननामा ऑनलाईन – देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती थाटामाटात साजरी केली. यावेळी कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळल्या गेल्या आहेत. किल्ले शिवनेरीवर देखील शिव जयंतीचा सोहळा आयोजित करण्यता आला होता. परंतु यावेळी राज्य सरकारनं काही निर्बंध घातले होते. यामुळं अनेक शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली. शिवनेरीवर जन्म सोहळ्याला फक्त 100 जणांना उपस्थित रहाता येणार या निर्णयामुळं अनेकांनी निषेधही केला. दरम्यान शिव जयंती साजरी करण्यावर घातलेल्या निर्बंधांवर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवनेरीवर आयोजित सोहळ्यात अमोल कोल्हे म्हणाले, शिवभक्त म्हणून माझीही भावना आहे की, जे निर्बंध घातले आहेत त्यामुळं माझाही हिरोमोड झाला आहे. आपण दोन पावलं मागे आलो असलो तर ही पुढील वर्षी जोरात शिव जयंती साजरी कर करू. कोरोनाचे नियम पाळूनच आपण शिव जयंती साजरी करू. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी रायगडावर विद्युत रोषणाई केली. यात डिस्को लाईट वापरण्यात आले. यामुळं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अमोल कोल्हे यांनी यावर भाष्य करताना सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जे घडलं त्याबाबत मला जास्त माहिती नाही. परंतु माध्यमांमधून वाचण्यात आलं आहे. रायगडाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे.
अमोल कोल्हे यांनी यावर्षी शाश्वत शिव जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराजांच्या 391 व्या जयंती निमित्त त्यांनी 391 झाडं लावण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. त्यांनी वनउपविभाग, जुन्नर आणि पुरातत्व विभागाच्या सहकार्यानं शिवनेरीवर 391 झाडं लावण्याचा निश्चय केला आहे. हेच आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील इतर गावांनाही केलं आहे.