मुंबई: बहुजननामा ऑनलाईन – मुबई येथे झळकलेल्या ‘फ्री काश्मीर’ या पोस्टरवरून सध्या राजकारण्यांमध्ये वाद सुरु आहे. शब्दांचे भलतेच अर्थ सांगून तुम्ही जनतेची दिशाभूल कशी काय करू शकता? असा टोमणा काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांना मारला आहे. तसेच ‘फ्री काश्मीर’ या पोस्टरवरून उद्धव ठाकरे यांना निशाणा करत तुम्ही हे खपवुन घेणार का?’ असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांच्या या प्रश्नाला जयंत पाटीलांनी उत्तर दिल्यावर फडणवीस यांनी पाटीलांच्या उत्तराला पुन्हा उत्तर दिले आहे. यामुळे
त्यांच्यात ट्विटयुद्ध झाल्याचे दिसून आले.
What a pity!
Now separatist tendencies get a Government advocate.
Jayantrao, this vote bank politics is not expected from you.
Kashmir has already been freed from discrimination and … (1/2) https://t.co/VRZURYMnZk— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 7, 2020
“मुंबईत आझाद मैदानात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर्स झळकवण्यात आले. या पोस्टर्सचा अर्थ काश्मीरला सर्व भेदभावापासून, मोबाईल नेटवर्कच्या बंदीपासून आणि केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करा असा होतो. मात्र, मला विश्वास बसत नाही की, तुमच्यासारखे जबाबदार नेते द्वेषपूर्ण मार्गाने शब्दांचा खेळ करीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सत्ता गमावल्यामुळे की स्वतःवरील नियंत्रण गमावल्यामुळे होत आहे?”, असे जयंत पाटील म्हणाले.
Protest is for what exactly?
Why slogans of “Free Kashmir”?
How can we tolerate such separatist elements in Mumbai?
‘Free Kashmir’ slogans by Azadi gang at 2km from CMO?
Uddhav ji are you going to tolerate this Free Kashmir Anti India campaign right under your nose???@OfficeofUT https://t.co/zkWRjxuTqA— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 6, 2020
त्यावर फडणवीस यांनी उत्तर देत “तुमची मला दया येते. फुटीरतावादी वृत्तीला आता सरकारी वकील मिळाला आहे. जयंतराव तुमच्याकडून व्होट बँकेचं राजकारण अपेक्षत नाही. काश्मीरमध्ये कधीच भेदभाव नव्हता. फक्त सुरक्षेसाठी काही काळापासून तिथे निर्बंध आहेत. सरकारमध्ये असू किंवा विरोधीपक्षात राष्ट्र सर्वप्रथम हेच आमचं तत्व राहिलं आहे,” असे म्हटले.
Devendraji It’s 'free Kashmir' from all discriminations, bans on cellular networks and central control. I can't believe that responsible leader like you trying to confuse people by decoding words in such a hatred way. Is it losing power or losing self control? #JNUViolence https://t.co/wr3KPnWr5n
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 7, 2020
जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याविरुद्ध मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर’ असे फलक दाखवले होते. त्यावर भाजप, काँग्रेस आणि काही बॉलीवूड कलाकारांनी आक्षेप घेतला होता. जेएनयूमधील हिंसाचाराविरोधातील आंदोलनात काश्मीरचे पोस्टर्स कशासाठी? असा प्रश्नही अनेकांनी केला आहे.